
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :-अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात साधूसंतांच्या उपस्थितीत मंत्रघोषाच्या साक्षीने मंत्रित झालेल्या ‘अक्षदा कलशाचे’ गुरुवार (दि.२१) रोजी कोपरगाव शहरात आगमन होताच आ.आशुतोष काळे यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत सवाद्य मिरवणूक काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
श्री क्षेत्र अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी भव्य मंदिरात श्रीरामलल्लाच्या शिल्पाची स्थापना होणार असून या भव्यदिव्य सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथून श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे संपूर्ण देशात अभिमंत्रित केलेला ‘अक्षदा कलश’ पाठविण्यात आला असून या ‘अक्षदा कलशाचे’ कोपरगाव शहरात आगमन होताच आ.आशुतोष काळे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाचा जयघोष करत ‘अक्षदा कलशाचे’ विधिवत पूजन करून मनोभावे दर्शन घेतले.या ‘अक्षदा कलशाचे’ दर्शन घेण्यासाठी कोपरगाव शहरातील चौकाचौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,रमेश गवळी,हाजीमेहमूद सय्यद,दिनकर खरे,राजेंद्र वाकचौरे, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, डॉ.तुषार गलांडे,बाळासाहेब रुईकर,मुकुंद इंगळे,राजेंद्र खैरनार,एकनाथ गंगूले,राजेंद्र जोशी,मनोज कडू,राजेंद्र आभाळे,विकास बेंद्रे,सोमनाथ शिंदे, नितीन शिंदे,संतोष शेजवळ,विजय नागरे,सेवासींग सहानी,चंद्रकांत धोत्रे, हर्षल जैस्वाल,अमोल आढाव,ठकाजी लासुरे,अर्जुन ठुबे,आकाश गायकवाड,रोशन खडांगळे,सौ.भाग्यश्री बोरुडे,भारती शिंपी,शितल लोंढे आदी उपस्थित होते.