
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ५९ व्या गळीत हंगामाची सांगता संचालक प्रदिप नवले,सौ.प्रतिभा नवले यांच्या हस्ते तर माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते सहकारातुन ट्रायईथाइल ऑर्थोफॉर्मेट व इथॉक्सी मिथाईल मेलेनिक ईस्टर हे रासायनिक उपपदार्थ तयार करावयाचे त्याच्या उत्पादनाचाही शुभारंभ संचालक युवानेते विवेक कोल्हे व सौ.रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी झाला त्याप्रसंगी सभासद शेतक-यांना मार्गदर्शन करतांना अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे समवेत कार्यकारी संचालक बाजीराव सुतार व सर्व संचालक
संपादक – राजेंद्र तासकर
पेट्रोलला पर्याय म्हणून जगात ग्रीन हायड्रोजनवर मोठया प्रमाणात संशोधन सुरू होवुन त्याच्या अमलबजावणीसाठी त्यातील तज्ञ आता पुढे येवू लागले आहेत मात्र माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्वतःच्या अभ्यासातून सभासद शेतक-यांच्या सहकार्यातून नवनविन तंत्रज्ञानाचा आधार घेत काळाच्या कितीतरी अगोदर पुढे जात उसापासून केवळ साखर एके साखर उत्पादन न घेता साखरेबरोबरच हायड्रोजनेशनचा पाया घातला त्यातुन उपपदार्थ निर्मातीबरोबरच औषधी उत्पादने घेतली आणि देशात सर्वप्रथम सहकारी तत्वावर ज्युस पासून इथेनॉल बनविणारा कोल्हे कारखाना ठरला असुन त्याचे लवकरच पेटंट मिळविणार असुन उसाला सर्वाधिक भाव देण्याची संजीवनीची परंपरा पुर्वीपासूनची आहे,चालू गळीतास सभासद शेतक-यांच्या उसाला आणखी जास्तीचा दर १०० रूपये प्रति मे. टन देणार असल्याचे सुतोवाच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ५९ व्या गळीत हंगामाची सांगता संचालक प्रदिप नवले,सौ.प्रतिभा नवले यांच्या हस्ते तर माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते सहकारातुन ट्रायईथाइल ऑर्थोफॉर्मेट व इ इथॉक्सी मिथाईल मॅलेनिक ईस्टर हि रासायनिक उपपदार्थ तयार करावयाचे त्याच्या प्रत्यक्ष उत्पादनाचाही शुभारंभ संचालक युवानेते विवेक कोल्हे व सौ. रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी झाला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी.सुतार यांनी प्रास्तविकात चालू गळीत हंगामाचा आढावा देवुन यावर्षी आलेल्या अडचणींचे निराकरण पुढील वर्षी करण्यांसाठी अभ्यासु अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संजीवनीने काय नियोजन हाती घेतले आहे याबाबतची संपुर्ण माहिती देत कारखान्यांस वसंतदादा शुगर इन्स्टीटयूटकडुन मिळालेला सर्वोत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमतेचा पुरस्कार स्व.शंकरराव कोल्हे यांना समर्पित केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे व सर्व संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे,संचालक सर्वश्री. अरूणराव येवले,साहेबराव कदम,शिवाजीराव वक्ते, सोपानराव पानगव्हाणे,संजय होन,राजेंद्र कोळपे,फकिरराव बोरनारे,अशोक औताडे,मनेष गाडे,निवृत्ती बनकर,मच्छिद्र लोणारी,ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब नरोडे,अशोकराव भाकरे,विश्वासराव महाले,मच्छिंद्र टेके,कामगार नेते मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज,कैलास माळी, भास्करराव तिरसे,साहेबराव रोहोम,विक्रम पाचोरे,सुनिल देवकर,साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे,चीफ केमिस्ट विवेक शुक्ला,चीफ इंजिनियर के के शाक्य,केन मनेजर जी बी. शिंदे,उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर,सचिव तुळशीराम कानवडे यांच्यासह विविध संस्थाचे आजी माजीपदाधिकारी,संचालक, खातेप्रमुख,उपखातेप्रमुख, कार्यकर्ते,संजीवनी उद्योग समुहातील सर्व संस्थाचे पदाधिकारी,कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री.बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने इतिहासात प्रथमच उच्चांकी ९ लाख ४२ हजार ५०९ मे.टन उसाचे गाळप केले. कुठल्याही शेतक-यांचा उस शेतात गाळपाविना राहु नये हे माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे सततचे सांगणे असायचे म्हणुनच हा हंगाम एप्रिल ऐवजी ५ जुन पर्यंत आपल्याला घ्यावा लागला. मात्र चालूवर्षी उसतोडणी कामगारांच्या बाबतीत वाईट अनुभव आला,उसाचे उत्पादन वाढते आहे.गाळप क्षमता एका दिवसात वाढत नसते,त्यासाठी पुढच्या हंगामाची तयारी आम्ही आजपासुन सुरु केली असून सभासदांच्या मालकीचे हार्वेस्टर झाले पाहिजे यावर आला जोर असणार आहे.
केवळ साखर उत्पादन घेवुन सहकारी कारखानदारी चालविणे तोटयाचे आहे.जगात ब्राझील सर्वाधिक साखर निर्यातीचा देश असायचा पण यंदा रशिया युक्रेन युध्दामुळे ब्राझीलने इथेनॉल उत्पादनावर भर दिला त्यामुळे साहजीकच भारत देश जगात साखरेचा पहिला निर्यातदार देश बनला आहे. अन्यथा येथील उद्योगाला ३०० ते ४०० रूपये प्रतिटन तोटा सहन करावा लागला असता.पंतप्रधान नरेंद्र मोदी,देशाचे सहकारमंत्री अमित शहा,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या सर्व सहका-यांनी इथेनॉल निर्मीतीस प्रोत्साहन देवून त्यानुरूप धोरणे घेतली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील साखर उद्योगाच्या अडचणी मांडून त्याची सोडवणुक केली, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला आयकराचा प्रश्न मार्गी लावला म्हणून साखर उद्योगाला बरे दिवस आले आहेत.शासन उसाची एफआरपी वाढवते त्याचबरोबर त्यांनी कारखानदारांना दिलासा देण्यासाठी साखर विक्रीच्या न्युनतम किमतीतही त्याच रेषोप्रमाणे वाढ करावी.
स्व.शंकरराव कोल्हे यांचे आम्हांस सातत्यान नव नविन तंत्रज्ञान आत्मसात करा म्हणून सांगणे असायचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीवर भर देत येथेच स्वतःच्या सुसज्ज संशोधन प्रयोगशाळा उभारून जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ यादव यांच्याबरोबरच देश विदेशातील तंत्रज्ञांचे मार्गदर्शन आम्ही घेत असून त्याजोरावर पॅरासिटामोल औषधी उत्पादन घेणा-या पहिल्या क्रमांकावर संजीवनीचेच नाव असणार आहे.
विटामिन ए आणि बी यासह इतर ३० औषधात ट्रायईथाइल ऑर्थोफॉर्मेट व जेनेरीक औषधात इथॉक्सी मिथाईल मैलेनिक ईस्टर या रासायनिक उपपदार्थाचा समावेश आहे त्याचे उत्पादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यात युवानेते विवेक कोल्हे यांच्या कल्पकतेतून सुरू झाले आहे.
कारखान्याच्या आजवरच्या प्रगतीत ज्या ज्या ज्ञात सभासद शेतक-यांनी दिलेले योगदान अत्यंत मौलीक असुन संचालक,कारखाना व्यवस्थापन, अधिकारीही व कामगारांनीही त्याच परिश्रमातून यश साध्य करण्याचा ध्यास घेतला त्याबद्दल त्यांचे कौतुक तेवढे थोडेच आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत राज्यात सर्वाधिक उस उत्पादन घेणां-या शेतक-यांचा,तसेच कार्यक्षम कार्यकारी संचालक, अधिकारी,चीफ केमिस्ट,चीफ इंजिनियर,उसविकास अधिकारी आदिंचा सन्मान होतो त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या या सर्व घटकांचा समावेश होवुन त्यांना पुरस्कार मिळण्यासाठी प्रत्येकांने झटुन काम करावे अशी अपेक्षा बिपीनदादा कोल्हे यांनी शेवटी व्यक्त केली.उपाध्यक्षआप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.