
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव -येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम.कॉलेजचा विद्यार्थी अभिजीत बाविस्कर याला ‘जलजीवन मिशन योजने’अंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळून रोख ११००० रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ‘जलजीवन मिशन’अंतर्गत दि २३जानेवारी २०२४ रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री.अभिजीत चंद्रकांत बाविस्कर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला व त्याला ११००० (अकरा हजार रुपये ) रोख बक्षीस व प्रमाणपत्र मा.श्री.आशिष येरेकर (IAS) जिल्हा प्रशासन अधिकारी अहमदनगर व जलजीवन मिशन प्रकल्प अधिकारी मा.श्री.प्रशांत जगताप यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन आदरणीय ॲड.श्री.भगीरथ शिंदे साहेब,महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.ॲड.संदीप वर्पे,मा.सौ.चैतालीताई काळे,मा. श्री.विवेकभैय्या कोल्हे,मा.श्री.सुनील गंगुले,मा.श्री.महेंद्रकुमार काले,मा.श्री. बाळासाहेब आव्हाड,महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी अभिजीत बाविस्कर याचे हार्दिक अभिनंदन केले.सदर विद्यार्थ्यास सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.बाबासाहेब शेंडगे यांचे मार्गदर्शन लाभले.महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.उज्ज्वला भोर,डॉ.अर्जुन भागवत, डॉ.बाबासाहेब वर्पे,प्रा.संजय शिंदे,कार्यालयीन अधीक्षक श्री.सुनील गोसावी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही बाविस्कर याचे कौतुक करून त्याचे हार्दिक अभिनंदन केले आहे.