Homeकोपरगावदेशाची संसद उज्वल भारताच्या विकासाचे मंदिर - विवेकभैय्या कोल्हे

देशाची संसद उज्वल भारताच्या विकासाचे मंदिर – विवेकभैय्या कोल्हे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

     देशाची संसद उज्वल भारताच्या विकासाचे मंदिर असुन युवाशक्तीच्या हाती अमृत कलश सोपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सर्व केंद्रीयमंत्री मंडळाने नऊ वर्षात नवनिर्माण कार्याला योग्य दिशा दिली असून त्याचा प्रत्येक भारतवासियांना गर्व असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी करून नवविकासाच्या प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी असेही ते म्हणाले. 

थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून ते पूढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची जगात नव्याने ओळख निर्माण केली असुन ४ कोटी दारिद्रय रेषेखालील, गरीब,मध्यमवर्गीयांना घरे, ११ कोटी शौचालये,४ लाख किलोमीटरचे नवीन रस्ते,५० हजार अमृत सरोवर,३० हजार नवीन पंचायत भवन,जल जीवन मिशन योजनेतून सर्वांसाठी पाणी यासह अगणित विकास कामांचा पाया केंद्रीय व राज्यमंत्रिमंडळाने घातला आहे.
युवाशक्ती केंद्रीभूत मानून त्यांची भविष्यातील सगळी स्वप्ने पूर्ण होण्याच्या दृष्टीने सुमारे ९०० कोटी रुपये खर्चाचे ऐतिहासिक संसद भवनाचे लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदिंच्या हस्ते झाले हा १४० कोटी लोकसंख्येसाठी सुवर्णक्षण असुन येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या आत्मनिर्भर विकासाचे हे केंद्र आहे.
जो थांबला त्याचा विकासही थांबेल जो चालत राहिला त्याला सतत नवानविन उर्जा मिळेल.विकसनशिल भारताला विकसीत मार्गावर घेऊन जाण्यांसाठी येथील प्रत्येकभारतीयांचा आत्मविश्वासच कामाला येणार आहे, असे सांगुन विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की,इकोफ्रेंडली नवनिर्माण संसद भवनाचे जगभरातून कौतुक होत आहे.केंद्रातील मोदी शासनाने गेल्या ९ वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती देऊन युवा शक्तीला आत्मनिर्भर बनवुन त्यांच्या प्रत्येक संकल्पनांना स्टार्टअपच्या माध्यमांतून मोठी उपलब्धी निर्माण करून दिली आहे.भारतीय जनता पक्ष आणि त्याचे समर्थशाली नेर्तृत्वच आपल्या सर्वांना नवनविन बाबींची ओळख करून सबका साथ,सबका विकास याची अनुभुती देणारे आहे. डिजीटल इंडिया, संसद नवनिर्माण,वंदे भारत रेल्वे,ऑनलाईन कार्यप्रणाली, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी समारंभ,अनेक नविन कायदे,वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत भविष्यात होऊ घातलेले नवे नेतृत्व,मेट्रो रेल्वे,समृद्धी महामार्ग,अयोध्येतील श्रीराम मंदिर,राष्ट्रीय देवस्थानांचा एकात्मीक विकास, काशि नवनिर्माण, ७५ रुपयांचं नवीन नाणं,विशेष टपाल तिकीट आदी सगळी बोलकी उदाहरणे नऊ वर्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे वैशिष्टये दर्शविते असेही ते शेवटी म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!