Homeकोपरगावमाणसाने आपल्या निरोगी आयुष्यासाठी रोज एक तास वेळ द्यावा -डाॅ गौरव वर्मा

माणसाने आपल्या निरोगी आयुष्यासाठी रोज एक तास वेळ द्यावा -डाॅ गौरव वर्मा

संपादक -राजेंद्र तासकर

 आज धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाही माणसिक आर्थिक विवंचनेत असलेल्या माणसाला रक्तदाब शुगर आदि व्याधींचा सामना करावा लागतो आहे हे टाळण्यासाठी रोज सकाळी अर्धा तास व सायंकाळी अर्धा तास वेळ द्यावा पायी चालणे योगासने प्राणायाम करावा कोणत्याही ताणतणावाच्या खाली न राहता मोकळ्या मनाने राहणे आवश्यक आहे असे विचार डॉ.गौरव वर्मा यांनी व्यक्त केले.
        कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच जेष्ठ महिला समिती श्री स्थानकवासी ओसवाल पंच (सकल जैन समाज) जय लक्ष्मी आई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय रोग,अस्थि
रोग तपासणी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.           या वेळी डॉ.गौरव वर्मा,डॉ.संदिप बोरले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन
केले व तपासणी करण्यात येऊन उपचारासाठी सल्ला दिला.
 स्वागत प्रास्ताविक कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले अध्यक्षा सौ.सुधा कैलास ठोळे यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
        या प्रसंगी डॉ.रामदास आव्हाड,डॉ.रिद्धी आव्हाड,सौ. प्रियंका आढाव,डॉ.वैष्णवी शिंदे आदिंचा विशेष सन्मान करण्यात आला.

समारंभासाठी उद्योजक कैलास शेठ ठोळे,उत्तमभाई शहा, दत्तोपंत कंगले,रजनीताई गुजराथी,सौ शैलजा रोहोम, सुतारताई,डॉ.विलास आचारी, महाविर दगडे,अशोक पापडिवाल,संजय बंब,सुनील बेदमुथा,विकास आढाव,फंड महेश मते,गणेश कानडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!