Homeकोपरगावलोकप्रतिनिधींना नमुना नंबर ७ ची आताच आठवण झाली का - साहेबराव रोहोम

लोकप्रतिनिधींना नमुना नंबर ७ ची आताच आठवण झाली का – साहेबराव रोहोम

संपादक – राजेंद्र तासकर

        पावसाळा सुरू होवुन दोन महिने झाली मात्र तालुक्यात पुरेशा प्रमाणात पर्जन्यवृष्टी झालेली नाही त्यामुळे पीक पाण्याची जेमतेम परिस्थिती आहे,तालुक्याचे हक्काचे पाणी शेजारच्या तालुक्यातील ४० गांवच्या पिण्याच्या पाण्यासाठी गेले,२००५ मध्ये समन्यायी पाणी वाटपाचा कायदाही त्यांच्याच कार्यकाळात होवुन त्या नियमान्वये चालु खरीप हंगामात जायकवाडीला ४२ टीएमसी पाणी गोदावरी नदीतुन वाहुन गेले येथील कालवे कोरडेठाक राहिले परिणामी बारमाही गोदावरी कालव्यांचे पाटपाण्याचा खेळखंडोबा झाला ही सर्व परिस्थिती माहिती असुनही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार आशुतोष काळे यांना नमुना नंबर ७ वर शेतक-यांनी पाणी अर्ज भरून पाणी मागणी करावी याची आठवण एव्हढ्या उशीरा का झाली असा सवाल भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केला आहे. 
     श्री.साहेबराव रोहोम यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगांव शहराच्या पिण्यांच्या पाण्यासाठी निळवंडे शिर्डी कोपरगांव पाणी योजना मंजुर करून आणली परिणामी गोदावरी कालव्यांना शेतीसाठी पाण्यांचे एक आर्वतन वाढणार होते,कोपरगांव शहराला शाश्वत व बंदीस्त पाईपलाईनने पिण्यांसाठी स्वच्छ पाणी मिळणार होते मात्र लोकप्रतिनिधी व त्यांच्या बगलबच्च्यांनी या पाणी योजनेत खोडा घातला तसेच शेजारच्या तालुक्यातील ४० गांवच्या पिण्यांच्या पाणी योजनेसाठी दारणेवर आरक्षण टाकण्यात आले त्याचा फटका येथील शेती क्षेत्राला बसला.त्याबददल शेतक-यामध्ये मोठया प्रमाणांत अस्वस्थता असुनही लोकप्रतिनिधी चकार शब्द बोलत नाही,ओव्हरफ्लोचे पाणी बंद झाले,येथील भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालवत चालली आहे,शेती पाण्याचा खेळखंडोबा झालेला असतानाही लोकप्रतिनिधी अजुनही झोपेतच आहेत.नमुना नंबर ७ वर पाणी मागणीचा कळवळा दाखवुन शेतक-यांची त्यातुन ते दिशाभुल करीत आहेत असेही साहेबराव रोहोम शेवटी म्हणाले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!