

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्णकार समाजाच्या वतीने बुधवारी (८ फेब्रुवारी) कोपरगाव शहरातील श्री नरहरी-विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून संत नरहरी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच नागरिकांना महाप्रसाद वाटपाची सेवा केली.
संत नरहरी महाराज हे वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी होते.संत नरहरी महाराजांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता.ते कट्टर शिवभक्त होते.एकदा प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की,पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे.शिव आणि विष्णू भिन्न नाहीत तर एकच आहेत,हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत.शिव आणि विठ्ठल एकच आहेत,असा साक्षात्कार नरहरी महाराजांना झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला.या साक्षात्कारानंतर नरहरी महाराजांच्या मनात असलेला हरी-हराचा वाद मिटला आणि समाजात,वेगवेगळ्या पंथांमध्ये असलेला हा वाद मिटवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी कोपरगाव येथे श्री नरहरी-विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अनेक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी श्री विठ्ठल,रुक्मिणी मूर्तीचे दर्शन घेतले.तसेच संत नरहरी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून मन:पूर्वक अभिवादन केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले,तुलसीदास खुबानी,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,स्वप्नील निखाडे,माजी नगरसेवक अतुलशेठ काले,विनोद राक्षे,नयनकुमार ऊर्फ बबलू वाणी,अशोकराव लकारे,संजय मंडलिक,मुकुंद उदावंत,रवींद्र रोहमारे,वैभव आढाव,संदीप देवकर,संजय उदावंत,रंजन जाधव,प्रकाश भडकवाडे,संजय उदावंत,संजय जगदाळे,वैभव गिरमे,गोपीनाथ गायकवाड,प्रमोद नरोडे,चंद्रकांत उदावंत,चंद्रकांत नागरे,संतोष नेरे,कृष्णाशेठ उदावंत,सुरेशशेठ विसपुते,संतोष साबळे,बाळासाहेब राऊत,तुषार बागुल आदींसह पदाधिकारी,कार्यकर्ते व सुवर्णकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.