
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : कोपरगाव शहरात भाजप व इतर विविध संस्था,संघटनांच्या वतीने मंगळवारी (१ ऑगस्ट) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.रात्री शहराच्या विविध भागातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी रात्री धारणगाव रोडवरून डीजे,बँजो व ढोल,ताशांच्या गजरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो,लहुजी वस्ताद साळवे यांचा विजय असो,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत जंगी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत पराग संधान यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,माजी आमदार भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच सर्व समाजबांधव व भगिनींना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी वस्ताद युवा फाउंडेशन,धारणगाव रोड,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटना, संजयनगर,लहुजी वस्ताद चौक मित्रमंडळ,सुभाषनगर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ, लक्ष्मीनगर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, हनुमाननगर मित्रमंडळ आदींच्या वतीने रात्री वाजतगाजत अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.विविध भागातून निघालेल्या मिरवणुकीत अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान,भाजपचे शहराध्यक्ष डी आर.काले,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,शिवसेना नेते कैलास जाधव, ‘अमृत संजीवनी’चे संचालक गोपीनाथ गायकवाड,संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बागुल,माजी नगरसेवक जितेंद्र रणशूर,अल्ताफभाई कुरेशी,दिनेश कांबळे, रवींद्र रोहमारे,कृष्णा पवार,शिवाजीराव खांडेकर, सतीश नरोडे,सोमनाथ म्हस्के,शरद त्रिभुवन,भगवान मरसाळे,अर्जुन मरसाळे,सुरेश मरसाळे,रंगनाथ मरसाळे,रवींद्र शेलार,योगेश शेलार,संदीप निरभवणे,अमोल बागुल, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अनिल नन्नवरे, तालुका उपाध्यक्ष फकिरा चंदनशिव,अनिल जाधव,दौलतराव शिरसाठ,राजेंद्र साळवे,प्रभुदास पाखरे,रवींद्र पोळ,सुखदेव जाधव,सतीश साबळे,जगदीश मोरे,सुजल चंदनशिव,एन.टी.त्रिभुवन,मोरू म्हस्के,सागर खंदारे,दिनेश भालेराव,आकाश खैरनार,पिंटू नरोडे,शंकर बिऱ्हाडे,खालिकभाई कुरेशी, सलीमभाई कुरेशी,नसीरभाई सय्यद,फकिर मोहम्मद पैलवान,एस.पी. पठाण,सागर विसपुते,रंजन जाधव, पप्पू पडियार,संतोष नेरे,दिलीप तुपसैंदर,संजय तुपसैंदर,विजय चव्हाणके,रोहित कनगरे आदींसह मातंग समाजाचे नागरिक,माजी नगरसेवक,भाजप,भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पराग संधान यांनी कार्यकर्त्यांसह डीजेच्या तालावर ठेका धरत मिरवणुकीत रंगत आणली.