
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : -अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त संवत्सर वाघीनाला वस्ताद प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाजपा दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे उपस्थित होते. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.यावेळी बोलताना काळे म्हणाले अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिशा दिली.

पुढे बोलतांना ते म्हणाले कि,माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांचा पहिला पुतळा देशात सर्वप्रथम कोपरगाव येथे स्थापन केला याबद्दल मुकुंद मामा काळे यांनी माहिती दिली. कोल्हे साहेब स्वतः त्यांच्या गावी जाऊन फोटो मिळवून पुतळा तयार करून घेतला त्यानंतर कोपरगाव येथे स्थापन केला. त्यानंतर इतर ठिकाणी अनेक पुतळे उभे राहिले.परीस्थितीमुळे अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण जरी कमी झाले मात्र आज सर्व शाळेत त्यांचे चरित्र अभ्यासाला आहे याचे कारण त्यांचे ज्ञानाची दखल परदेशात देखील घेतली गेली होती असे मत व्यक्त केले. यावेळी वस्ताद प्रतिष्ठानच्या वतिने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघिनाला 30 विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वही,पट्टी,पेन, पेन्सिल, रबर यांचे वाटप केले.
या कार्यक्रमाला दिलीप कासार, छायाताई मुकुंदमामा काळे,वस्ताद प्रतिष्ठान संवत्सर संस्थापक – विशाल पगारे,अध्यक्ष -राहुल खरे,उपाध्यक्ष – प्रदीप खरे,रावसाहेब खरे,महेफुज शेख, वैभव पगारे,कांतीलाल पगारे, कृष्णा पगारे,साहिल बागुल,भानुदास खरे,बाळासाहेब बागुल,सूरज खरे, समरप्रीत खरे,दिगंबर खरे,कृष्णा खरे, संदीप खरे,दिलीप खरे,जनार्दन पगारे, रंगनाथ पगारे,विशाल खरे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.