
संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
अकरा वर्षांपूर्वी कोपरगाव शहरातील अनेक टपरी धारक विस्थापित झाले मात्र अद्याप त्यांचे पुर्नवसन झाले नाही मात्र कोपरगाव बस स्थानकात मंजूर झालेल्या व्यापारी संकुलात विस्तापित टपरी धारकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेली अतिक्रमणे अकरा वर्षांपूर्वी काढली त्यात अनेक गोरगरीब टपरी धारक विस्तापित झाले होते अनेक टपरी धारकांचे दुकाने गेल्यामुळे अनेकांवरउपासमारीची व दुसऱ्या कडे मोलमजुरी करण्याची वेळ आली, विस्तापित टपरी धारकांनी पुनर्वसन व्हावे म्हणून अनेकदा नगर पालिकेकडे मोर्चे,आंदोलने करून व अर्ज विनंत्या करून पाठपुरावा केला मागील दहा वर्षात सर्व राजकीय नेत्यांनी टपरी धारकांचे पुणर्वसन करू अशी आश्वासने दिली मात्र विस्तापित टपरी धारकांच्या प्रश्नाकडे कोणीच लक्ष दिले नाही त्यातच मागील काही महिन्यांपूर्वी पुन्हा नव्याने अतिक्रमणाचा हातोडा पडला.
राजकीय नेत्यांकडून टपरी धारकांना कधी खोका शॉप तर कधी हॉकर्स झोन ची आश्वासने दिली गेली मात्र खऱ्या अर्थाने दहा अकरा वर्षात टपरी धारकांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष दिले नाही.
कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष दादा काळे यांनी नुकतेच बस स्थानकातील व्यापारी संकुला साठी १४ कोटी रुपये निधी मंजूर केल्याचे जाहीर केले भविष्यात या जागेवर व्यापारी संकुल उभे राहिल मात्र या व्यापारी संकुलात बांधण्यात येणाऱ्या गाळ्यामध्ये शहरातील धन दांडगे लोक गाळे विकत घेण्यासाठी चढाओढ करतील मात्र यात गोरगरीब व अकरा वर्षांपूर्वी विस्तापित टपरी धारकांना प्राधान्याने संधी देऊन पुनर्वसन करावे अशी मागणी या पत्रकाद्वारे केली आहे.