

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांतील इयत्ता दहावी मधील विद्यार्थीचा निरोप तथा सदीच्छा समारंभ मोठा उत्साहाने संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जगदंबा बी.एड.काॕलेजचे प्राचार्य श्री.दादासाहेब मोरे हे उपस्थित होते.अमेरीकेतअसलेले माजी विद्यार्थी सचिन भाबड,दिलीप तुपसैंदर देखिल या प्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी दहावीतील विद्यार्थी कु.आरती म्हस्के, कु.सिध्दी चव्हाण,वैष्णवी नागुडे,रामेश्वर निंबाळकर,सार्थक वाघ,ओंकार कुहीटे आदि विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थीनी पुढील वाटचालीत डाॕक्टर किंवा इंजिनिअर होण्यापेक्षा उद्योजक बनावे.आपले व्यक्तीमत्व विकसित करुन उत्तम नागरीक व्हावे आणि देशसेवा करावी असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी केले.सध्याची सामाजिक स्तरावरील परिस्थिती लक्षात घेवुन विद्यार्थीनी आपले मित्रा बरोबरची मैत्री पारखुन घ्यावी व पुढील वाटचाल करावी असे मत संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे यांनी मांडले.माजी विद्यार्थी सचिन भाबड यांच्यावतीने विद्यार्थीना रायटींग पॕडचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी विद्यालयांचे आदरस्थान कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत उपमुख्याध्यापक आर.बी. गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.डी.गोरे तर आभार पर्यवेक्षिका उमा रायते यांनी मानले.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य संदीप अजमेरे,राजेश ठोळे आदीनी विद्यार्थीना एस.एस.सी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
याकार्यक्रमाला शिक्षक वृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.