Homeकोपरगावदेशाला समृद्ध करण्यासाठी एकजुटीने उभे राहण्याची आवश्यकता : मा.आ. सौ.स्नेहलताताई कोल्हे

देशाला समृद्ध करण्यासाठी एकजुटीने उभे राहण्याची आवश्यकता : मा.आ. सौ.स्नेहलताताई कोल्हे

कोपरगावतील स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यालयात भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :- देशाला जगाचा विश्वगुरु बनविण्यासाठी,राष्ट्राच्या हितासाठी आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी पुन्हा एकदा जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्व मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकजुटीने एक शक्तीने त्यांच्यापाठिशी उभे राहून आपलं उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी एक दिलाने उभे रहा असे आवाहन कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.

भाजपा दिवस निमीत्ताने कोपरगावातील जनसंपर्क कार्यालयात बोलत होत्या.प्रथम वंदन भारत मातेला करीत स्व.शामा प्रसाद मुखर्जी,स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जनसंपर्क कार्यलयात भाजपाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष श्री.कैलास रहाणे,भाजपा शहराध्यक्ष श्री.डी.आर.काले,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष श्री.अमोल गवळी,भाजयुमोचे शहराध्यक्ष श्री.सिद्धार्थ साठे,श्री.शरद नाना थोरात,श्री.साहेबराव रोहोम, श्री.विक्रम पाचोरे,श्री.पराग संधान,श्री.दिलीप घोडके,श्री.हरिभाऊ गिरमे, श्री.महावीर दगडे,श्री.नरेंद्र डंबीर,श्री.सुरेश विसपुते,श्री.रवींद्र पाठक,श्री हरिभाऊ लोहकणे,श्री.कैलास खैरे,श्री.गोपीनाथ गायकवाड,श्री.भीमा संवत्सरकर,श्री.उत्तमराव चरमळ,आदींसह मान्यवर उपस्थित होते.

पुढे सौ.कोल्हे म्हणाल्या की, जनसंघापासून सुरू झालेला प्रवास आज जगातील एक नंबरचा भाजपा पक्ष झाला आहे.या प्रवासात पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी तो त्याग आणि बलिदान दिले आहे.त्यांच्या बलिदानाचे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे भाजपा स्थापना दिवस होय. यामध्ये स्व.शामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीन दयाळ उपाध्याय योगदान खुप मोठे आहे.देशातील शेवटचा घटक सुखी झाला पाहिजे यासाठी आयुष्य खर्च केले.त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने कृतज्ञतेचा दिवस आहे. केंद्रात दोनच खासदार असल्यापासून सुरू झालेला प्रवास आज ३००च्या पार आपण पोहचलो आहोत.भाजपा हा पक्ष सक्षम,समृद्ध,सामर्थ्यशाली, स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी सक्रीय आहे.जगाच्या स्पर्धेत आपण टिकलो पाहिजे यासाठी देशाचे लोकप्रिय नेतृत्व नरेंद्र मोदी यांचे एक स्वप्न आहे की,हिंदु प्राचीन संस्कृतीत असणारे संस्कार,सभ्यता ह्या जगाला देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जी राज्य घटना,संविधान दिले आहे.हे संविधान देशाचा आत्मा आहे.त्यास अनुसरून देशाची सेवा करायची आहे.निश्चितच हा जगापुढे वेगळा आदर्श आहे.समाज्याला परिवार मानून काम करणारे ही लोक आहेत.कोरोनात जे काम मोदींनी केले.या संकटकाळात मोदीजी उभे राहिले एक व्यक्ति भुकेने जाऊ दिला नाही.याकाळात तालुक्यात विवेकभैय्या कोल्हे आणि युवा कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली.कोरोंना सेंटर उभारले.संजीवनी उद्योग समूहाने महत्वपूर्ण योगदान दिले.बचतगटाच्या माध्यमातून मास्क दिले.पूर परिस्थितीत संजीवनी उद्योग समूह उभा राहीला.

आपण सत्तेत असो नसो आपण कायम कार्यरत असणारा आमचा परिवार आहे,ही शिकवण स्व.कोल्हे साहेबांची आहे.सत्ता नाही म्हणून आम्ही थांबलो नाही.पोटात एक आणि ओठात एक असे कधीही वागलो नाही, म्हणून भाजपाचा आमच्या कार्यावर प्रचंड विश्वास आहे.म्हणून पक्षनेतृत्व आमच्या पाठीशी उभे राहते.जेष्ठ कार्यकर्त्यांनी योगदान दिले त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे.

स्व.कोल्हे साहेबांनी असे कार्यकर्ते तयार केले जे आजही विवेकभैय्या कोल्हे सोबत काम करतात.त्याच उत्तम उदाहरण गणेश कारखान्याची निवडणूक होती.त्या निवडणुकीची चर्चा राज्यात झाली.त्या निवडणुकी तील जेष्ठांनी विश्वास कोल्हे साहेबांवर ठेवला तोच विश्वास विवेकभैय्या कोल्हेवर ठेवला.जो विश्वास आमच्या कोल्हे परिवारावर आहे तोच विश्वास भाजपावर आहे,आपल्या सेवेसाठी आम्ही कायम आहोत अशी ग्वाही माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी दिला.

याप्रसंगी भाजपाचे श्री.सतीश गायकवाड,श्री.नारायण गवळी,श्री. सादिक पठाण,श्री.रुपेश सिनगर,श्री.वसीम पटेल,श्री.राजेंद्र बागुल,श्री.हाजी फकीर मोहम्मद,श्री.जयप्रकाश आव्हाड,श्री.सचिन सावंत,श्री.खालीक कुरेशी,श्री. लचकभाई सय्यद,श्री.सतीश रानोडे,श्री.अनिल जाधव,श्री.शंकर बिऱ्हाडे, श्री.संतोष साबळे,श्री.विनोद चोपडा,श्री.दीपक राऊत,श्री.नवनाथ आरणे, श्री.दीपक जपे,श्री.गोरख देवडे,श्री.प्रकाश दवंगे,श्री.मनोज इंगळे, लक्ष्मीकांत संवत्सरकर,श्री.सलीम पठाण,श्री.नारायण मोरे,श्री.मुख्तार शेख, श्री.मनोज तुपे,श्री.गोपीनाथ गायकवाड,श्री.रहीम शेख,श्री.एस.बी.शेख, श्री.ज्ञानेश्वर रोकडे,श्री.संदीप निरभवणे,श्री.साईनाथ मंडलिक,श्री.विकास गायकवाड,श्री.रोहिदास पारखे,श्री.शिरीष राजपूत,श्री.शाम आहेर,श्री. जगदीश मोरे,श्री.रावसाहेब मोकळ,श्री.प्रशांत वाबळे,श्री.कानिफनाथ गुंजाळ,श्री.नानासाहेब होन,श्री.निखिल औताडे आदीसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!