
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त शंभर वृक्षांचे रोपण करण्यांत आले.
प्रारंभी संचालक बाळासाहेब वक्ते यांनी प्रास्ताविक केले.अध्यक्षपदावरुन बोलताना कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव म्हणाले की,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे वृक्षावर विशेष प्रेम असुन त्यांनी कोपरगांव विधानसभा मतदारसंघासह कार्यक्षेत्रात विविध प्रसंगानुरूप वृक्षारोपणोवर गेल्या २५ वर्षापासून सातत्याने भर देत आहे. कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांची आठवण म्हणुन शहरासह असंख्य गावात तसेच नगर-मनमाड महामार्ग, कोपरगांव संगमनेर मार्ग,झगडेफाटा परिसर,कोपरगांव पुणतांबा मार्गावर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो वृक्षांचे रोपण करून तरुणाईने वृक्ष दत्तक घेऊन ते वाढविण्यावर भर दिला आहे. जिल्हयाच्या भौगोलिक क्षेत्रापैकी ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक असतांना ते केवळ ११ टक्केच आहे. पर्यावरण असंतुलनामुळे निसर्गचक्र बिघडले आहे.भूवैष्मीकीकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यावर वृक्ष लावुन त्यांची वाढ करणे हा सोपा पर्याय आहे,त्यासाठी विवेकभैय्या कोल्हे जाणिवपुर्वक प्रयत्न करत आहे.निसर्ग वाचला तर भविष्यकाळआपल्याला उज्वल राहील त्यासाठी सर्वांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करावे व जास्तीत जास्त झाडे लावावे असे आवाहनही त्यांनी केले.या वृक्षलागवडीत कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी.सुतार,साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे,यांच्यासह विविध खाते प्रमुख उपखाते प्रमुख,कर्मचारी आदि सहभागी झाले होते.शेवटी पर्यावरण अधिकारी देवेंद्र पाटील यांनी आभार मानले.